गुरुवार, ९ जानेवारी, २०२५

वाई तालुक्यातील शेंदूरजने येथील हॉटेल कामगाराचा संशयास्पद मृत्यू ; रिपाइंचा आरोप: वाल्मीकला अटक करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा

सातारा : वाई तालुक्यातील शेंदूरजने येथील हॉटेल कामगाराचा मालकाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला असल्याचा आरोप रिपाइं ( आंबेडकर ) गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. संजय शेलार असे मृत हॉटेल कामगाराचे नाव असून केवळ राजकीय वरदहस्तापोटी मस्त्वाल हॉटेल मालक असलेल्या आणि वाल्मीक म्हणून परिचित झालेल्याने सहकाऱ्यांच्या साथीने आपल्याच हॉटेल कामगाराचा घात केला असल्याचा आरोप रिपाइं ( आंबेडकर ) गटाच्या पदाधिकाऱ्यांनी  केला आहे.  कण्हेर ते वाई तालुक्यात हॉटेल उभा करणाऱ्या आरोपी हॉटेल मालकाला आणि सातारा तालुक्यातील एका बड्या नेत्याचा जवळचा वाल्मीक म्हणून परिचित झालेल्या आरोपीला तत्काळ अटक करा, अन्यथा येत्या १४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

मृत संजय शेलार यांच्या वडिलांनी देखील मेढा पोलीस स्टेशनला तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र ती घेण्यात आली नाही. पोस्ट मार्टमध्ये देखील गंभीर मारहाणीमुळे संजय शेलार यांचा मृत्यू झाला असल्याचे, निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे तात्काळ हॉटेल कामगाराचा मारहाण करून  मृतदेह फेकून देणाऱ्या हॉटेल मालकावर तत्काळ गुन्हा दाखल करा, अन्यथा १४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व सातारा जिल्हाअध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा पदाधिकारी किरण ओव्हाळ, सुनील ओव्हाळ, अनिल बनसोडे, सुरेश नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंत्री जयाभाऊला एक दणका आवश्यक होता..! हितचिंतकांनी केले मत व्यक्त..!

सातारा: विरोधकांना रावणाची उपमा देणारे मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील वाढता अहंकार  रावणाच्या दिशेने वाटचाल करत असताना नियतीने त्यांना वेळीच...