*आमच्या पूर्वजांच्या कष्टाच्या मोबदला म्हणून मिळालेल्या हक्काच्या महार वतन जमिनी परत ( रिस्टोर) करा, अशी मागणी रिपाइं पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी केली आहे.
महार वतनाच्या जमिनी त्यांच्या वारसांच्या वारसांना परत करा व आमच्या पूर्वजांच्या कष्टाचा मोबदला म्हणून मिळाल्या महार वतन जमिनी परत करा या मागणीसाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आई महमता भिमाईच्या समाधीच्या दर्शनाने सातारा जिल्ह्यातून सुरुवात करणार असल्याची माहिती महार वतन हक्क अभियानाचे प्रमुख संयोजक दादासाहेब ओव्हाळ यांनी दिली
ओव्हाळ पुढे म्हणाले की,संपूर्ण देशामध्ये शिवकालीन काळात काही शिवकालीन वतन सातत्याने आढळून आलेले आहेत त्यामध्ये महार ,जागल्या या अशा प्रकारच्या लोकांनी दरम्यानच्या काळात ग्रामव्यवस्था पनामध्ये आपली योग्य अशी भूमिका बजावलेली आहे त्यामध्ये महार समाजाने ग्रामसेवेबद्दल इनाम व हक्क म्हणून शिवकालीन वतन व्यवस्थेमध्ये महार वतन ही संकल्पना अस्तित्वात आलेली आहे त्यामध्ये गावा गावाचे व्यवस्थापन करणे करता जी बलुते व्यवस्था होती,त्यामध्ये महार समाजाची हराकी हाडोळा हाडके असे प्रकार येतात (गावांमधील मेलेली जनावरे ओढून नेले व त्या ठिकाणी त्याची कातडी तर भागाचे विल्हेवाट लावणे तसेच गावामध्ये जागरण करून गावाचे संरक्षण करणे) त्यानंतर या संबंधित कामे पेशवाई पासून ते ब्रिटिश काळापर्यंत सुरू राहिली.ब्रिटिश लोकांनी ब्रिटिश कालीन वतनामध्ये गावाचे व्यवस्थापन व त्यांचा नफा (महसूल) मिळवण्याकरता पाटील कुलकर्णी ही पद कायम केली व त्यांनाच मदत व सहकार्य करण्याकरता चौगुला व महार या जमातींचा वापर करून घेण्यात आला.. शिवकालीन पाटील हे पद कायमस्वरूपी राहिले परंतु कुलकर्णी या पदास त्यांनी गावाचे कारभार दप्तर तसेच इतर माहिती देण्याकरता व ब्रिटिश अधिकाऱ्याची उठा ठेव म्हणून त्याला पगारी अंमलदार केले व त्यांच्याकडे चौगुला व महार हे कामास ठेवले मग एखाद्या गावात शासकीय अंमलदार आला की त्याची सेवा करणे जन्म मृत्यू याची माहिती देणे शासकीय जमिनीच्या बाबत माहिती देणे शासकीय झाडे तोड बाबत माहिती देणे चोरं दरोडेखोर बाबत माहिती देणे तसेच या गावाहून त्या गावात शासकीय माहिती पोहोचवणे इत्यादी कामे महार समाजाकडून करून घेतली जायची याबाबतचा स्वतंत्र पूर्व 1000 वर्ष काळातील रूढी परंपरा ग्रामसेवा याबाबत सखोल अभ्यास करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात याबाबत महार समाजाच्या हक्काचे जमीन व वतन त्यांना मिळवून देण्याचा अधिकार त्यांना प्राप्त करून दिला त्यामुळेच सदर कायद्याची अंमलबजावणी १ फेब्रुवारी १९६९ रोजी अमलात आली....
त्यामुळेच जमीन आमच्या घरी हक्काची नाही कुणाच्या बापाची... या घोष वाक्य..... म्हणून महार वतन हक्क अभियान सुरुवात करीत आहोत,.... १ फेब्रुवारी २०२५ आमच्या येणाऱ्या पिढीच्या उदरनिर्वाहाचे साधन आम्हाला उभा करावे लागेल म्हणूनच या आंदोलनामध्ये सर्वांनी ताकतीने सामील होऊया. जिल्हावार याचे संयोजक नेमण्यात येणार आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा