मंगळवार, ३१ डिसेंबर, २०२४

सार्व.बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे, फलटण - सातारा रस्त्याचे काम जलदगतीने मार्गी लावा : संतप्त जनतेची आर्त हाक

सातारा ( सम्राट गायकवाड ) : जिल्ह्याचे ठिकाण असलेला सातारा ते फलटण महामार्ग होण्यासाठी शासनाने पाऊले उचलली खरी,  मात्र रोगापेक्षा इलाज भयंकर अशा पद्धतीने फलटण ते आदर्की ह्या महामार्गाचे काम मागील दोन वर्षापासून सुरू आहे. संपूर्ण महामार्ग खोदून ठेवला असून त्यामुळे जनता पूर्णपणे त्रस्त असून अशावेळी सातारा जिल्ह्याचे शिवेंद्रसिंहराजे भोसले सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री झाले आहेत तसेच ते फलटण (आसू) गावाचे खर्डेकर घराण्याचे जावई देखील आहेत. त्यामुळे फलटणची जनता ह्या रस्त्याचे काम जलदगतीने करून दिलासा देण्याची आर्त हाक त्यांना देत आहे. 

फलटण ते आदरकी संपूर्ण रस्ता ठेकेदाराने खोदून ठेवला आहे. मागील दोन वर्षात केवळ ६ किलोमीटरचे सिमेंट काँक्रीटीकरण व पुलांची कामे २ वर्षात झाली आहेत. 
आता हे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराकडे केवळ १४ महिन्यांचा कालावधी बाकी असून सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेत काम पूर्ण करण्याची नोटीस ठेकेदाराला बजावली आहे. पण नोटीस देणे हे तकलादू प्रोसेस असून अभियंत्यांनी सातत्याने लक्ष ठेवून काम करून घेणे गरजेचे होते व आहे.

दोन वर्षापूर्वी फलटण ते आदर्की ह्या 27 किलोमीटरच्या कामाला सुरुवात करण्यात आली. तब्बल १२५ कोटी रुपये निधीची तरतूद ह्या महामार्गाच्या कामाला करण्यात आली. सरासरी प्रति किलोमीटर 5 कोटी रुपये अशा पद्धतीने १० मीटर रुंद असे सिमेंट काँक्रिटकरण कामाचे स्वरूप. मात्र, गेल्या दोन वर्षात सुरुवातीला संपूर्ण रस्ताच खोदण्यात आला. त्यामुळे वाहनधारकांना तसेच एस. टी.बसने रोज हजारोच्या संख्येने प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागला व लागतोय. आलिशान गाड्या असणारे नेते, अधिकारी व उद्योजक मात्र पुसेगाव अथवा लोणंद मार्गे साताऱ्याला जात असल्याने त्यांना हा विषय अद्याप गंभीर वाटलेला नाही. परंतु गेल्या दोन वर्षात अनेक दुचाकी चालकांचे ह्या रस्त्यावर अपघात झालेत. 

तीन वर्ष कामाची मुदत असलेल्या कामाचे केवळ १४ महिने बाकी राहिले आहेत. निधी अथवा भूसंपादन असे कोणतेही प्रश्न प्रलंबित राहिलेले नाहीत. मात्र आजपर्यंत संथ गतीने झालेले काम कुठेतरी अधिकारी ठेकेदारावर मेहेरबान आहेत का ? मुदतवाढ देवून अधिकचा मलिदा खाण्याचा हा उद्योग आहे. ह्या सर्व बाबींना  सातारा जिल्ह्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ब्रेक दिला पाहिजे आणि तत्काळ रस्त्याचा आढावा घेवून काम जलदगतीने मार्गी लावावे, अशी आर्त हाक सासरवाडी येथील जनता देत आहे.

गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४

तब्बल तेरा वर्षानंतर सातारा पत्रकार संघाची आज वार्षिक सभा ; वादळी सभा होण्याचे सभासद पत्रकारांचे संकेत

सातारा :  जिल्ह्यातून प्रश्न मांडण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या सातारा पत्रकार संघाची आज जाहीर वार्षिक सभा होत आहे. तब्बल तेरा वर्षानंतर सातारा पत्रकार संघाने वार्षिक सभेचे आयोजन स्वतःचे कार्यालय असताना पाठक हॉल, राजवाडा,सातारा येथे केले आहे. 


लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून परिचित पत्रकार. आणि त्या पत्रकार संघाची सभा तब्बल १३ वर्षानंतर आज दुपारी ४ वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे.  अनेक ज्येष्ठ आणि प्रामाणिक पत्रकारांनी सातारा पत्रकार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, पत्रकार संघाची वार्षिक सभा होत नसल्याने आणि आर्थिक लेखाजोखा असे अनेक विषयाबाबत अजिंक्य सह्याद्रीचे संपादक सम्राट गायकवाड यांनी धर्मदाय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आज अखेर वार्षिक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके यांच्यानंतर विनोद कुलकर्णी यांच्याकडे गेली १३ वर्ष सातारा पत्रकार संघाची धुरा होती. गेल्या १३ वर्षात अशा प्रकारे कोणतीही वार्षिक सभा घेण्यात आली नाही.त्यामुळे आजची सभा वादळी होण्याचे आणि नूतन अध्यक्ष निवड असल्याने अधिक वादळी होण्याचे संकेत मिळत आहेत.

स्वराज्य शक्ती सेनेच्या प.महाराष्ट्र अध्यक्षपदी कृष्णात माने यांची निवड ; अध्यक्षा करुणा मुंडे यांच्या हस्ते नियुक्ती सातारा

सातारा : स्वराज्य शक्ती सेनेच्या प.महाराष्ट्र अध्यक्षपदी कृष्णात माने यांची निवड करण्यात आली आहे.  स्वराज्य शक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा करुणा धनंजय मुंडे यांच्या हस्ते नुकतेच कृष्णात माने यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. 


पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक अशी कृष्णात माने यांचे कार्य पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात गेली अनेक वर्ष सुरू आहे. कोरोना काळात त्यांनी स्वखर्चाने कोट्यवधी रुपयांचे अन्न धान्य तसेच औषध आणि उपचारांवर खर्च केले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेवून स्वराज्य शक्ती सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत असून आगामी काळात पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्यकारणी तसेच तालुका अध्यक्षांच्या निवडी करून सामाजिक कार्याची वाटचाल अधिक वेगाने करणार असल्याचे कृष्णात माने यांनी सांगितले.

ओबीसी न्यायप्रविष्ठ मुद्दा मार्गी लावून स्था. स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्वरित घ्या : काँग्रेस ओबीसी सेलची मागणी

सातारा :  ओबीसी आरक्षण मुद्दा न्यायालयात रखडला असून सरकारने पुढाकार घेवून प्रश्न मार्गी लावावा आणि गेली ३ वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्वरित घ्याव्यात, अशी मागणी सातारा जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या बेलेट पेपर द्वारेच घेण्यात याव्यात, अशी देखील मागणी करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी,  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सहकार विभागाचे मनोज कुमार तपासे ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ अण्णा कुंभार ओबीसी विभागाचे सातारा तालुका अध्यक्ष सुरेश कुंभार वैभव गवळी, ईव्हीएम मशीन संयुक्त मोर्चाचे समन्वयक श्रीकांत कांबळे वैभव गवळी अशोक शेटे नाजिम इनामदार आदी. उपस्थित होते

बुधवार, १८ डिसेंबर, २०२४

ठरले...शिवेंद्रसिंहराजे पालकमंत्री ; मकरंद पाटील यांना मदत व पुनर्वसन खाते..!

सातारा ( सम्राट गायकवाड ) :  मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर खातेवाटप आणि पालकमंत्रीपद ह्यावरून महायुतीत घोडे आडले असताना एक exclusive माहिती न्युज अजिंक्य सह्याद्रीच्या हाती आली आहे. ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना पर्यटन खात्यासह सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात येणार आहे. तर ना.मकरंद पाटील यांना मदत व पुनर्वसन खाते जवळपास निश्चित झाले असल्याची माहिती नागपूरहून सूत्रांनी दिली. 


ना.शंभूराज देसाई यांना पुन्हा एकदा राज्य उत्पादन शुल्क खाते देण्यात येणार असून त्यांना पालकमंत्री म्हणून हिंगोली जिल्ह्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. ना.जयकुमार गोरे यांना कृषी अथवा कामगार मंत्री खाते मिळण्याची शक्यता असून त्यांना पालकमंत्री म्हणून सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी देण्याचे जवळपास निश्चित झाले असल्याचे सूत्रांनी नागपूर येथून माहिती दिली.

मंगळवार, १७ डिसेंबर, २०२४

फलटण - सातारा महामार्गाचे दोन वर्षात केवळ ६ किलोमीटरचे काम : दुचाकीधारक व प्रवासी मेटाकुटीला ; ठेकेदाराला बांधकाम विभागाची नोटीस

फलटण ( सम्राट गायकवाड ) : जिल्ह्याचे ठिकाण असलेला सातारा ते फलटण महामार्ग होण्यासाठी शासनाने पाऊले उचलली खरी,  मात्र रोगापेक्षा इलाज भयंकर अशा पद्धतीने फलटण ते आदर्की ह्या महामार्गाचे काम मागील दोन वर्षापासून सुरू आहे. संपूर्ण महामार्ग खोदून ठेवला असून केवळ ६ किलोमीटरचे सिमेंट काँक्रीटीकरण व पुलांची कामे २ वर्षात झाली आहेत. आता हे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराकडे केवळ १४ महिन्यांचा कालावधी बाकी असून सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेत काम पूर्ण करण्याची नोटीस ठेकेदाराला बजावली आहे. 

दोन वर्षापूर्वी फलटण ते आदर्की ह्या 27 किलोमीटरच्या कामाला सुरुवात करण्यात आली. तब्बल १२५ कोटी रुपये निधीची तरतूद ह्या महामार्गाच्या कामाला करण्यात आली. सरासरी प्रति किलोमीटर 5 कोटी रुपये अशा पद्धतीने १० मीटर रुंद असे सिमेंट काँक्रिटकरण कामाचे स्वरूप. मात्र, गेल्या दोन वर्षात सुरुवातीला संपूर्ण रस्ताच खोदण्यात आला. त्यामुळे वाहनधारकांना तसेच एस. टी.बसने रोज हजारोच्या संख्येने प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागला व लागतोय. आलिशान गाड्या असणारे नेते, अधिकारी व उद्योजक मात्र पुसेगाव अथवा लोणंद मार्गे साताऱ्याला जात असल्याने त्यांना हा विषय अद्याप गंभीर वाटलेला नाही. परंतु गेल्या दोन वर्षात अनेक दुचाकी चालकांचे ह्या रस्त्यावर अपघात झालेत. 

तीन वर्ष कामाची मुदत असलेल्या कामाचे केवळ १४ महिने बाकी राहिले आहेत. निधी अथवा भूसंपादन असे कोणतेही प्रश्न प्रलंबित राहिलेले नाहीत. त्यामुळे नूतन आमदार सचिन पाटील व सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराच्या रोजच्या रोज कामाचा आढावा घेत राहून वेळेत काम पूर्ण करून घेवून जनतेला दिलासा देण्याची आवश्यकता आहे.

भुजबळांसाठी ओबीसी पॉकेटमध्ये संतापाची लाट ; फलटणमध्ये बैठक ; ना.अजित पवारांचा निषेध : आमदार निवडून आणल्याची खंत व गर्भित इशारा

फलटण ( सम्राट गायकवाड )  : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तसेच ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात न आल्याने ओबीसी समाजात संतापाची लाट निर्माण झाली आहे. राज्यात ठीक ठिकाणी आंदोलने होत असताना ओबीसी समाजाचे प्राबल्य असलेल्या फलटण येथे महात्मा फुले समता परिषद पदाधिकारी व  कार्यकर्त्यांची आज बैठक झाली.  बैठकीत भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात न आल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच केवळ ओबीसी समाजाचा लढणारा योद्धा म्हणून छगन भुजबळ यांच्यासाठी पक्ष विसरून देखील फलटण तालुक्यातील ओबीसी समाजाने केवळ भुजबळ यांच्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणले. मात्र, आमच्याच नेत्याला डावलले जात असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत झलक दाखवून देवू असा इशारा देखील बैठकीत देण्यात आला. 


बैठकीत विशेषतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जहरी टीका करण्यात आली. नाशिक लोकसभा निवडणुकीत भुजबळ यांना डावलण्यात आले. पुढे राज्यसभेत पाठविण्याची वेळ आली तेव्हा अजित पवार यांनी पत्नी व नितीन पाटील यांना पाठविले. तुमची महाराष्ट्रात गरज आहे, असे सांगून अजित पवार यांनी निवडणुकीत भुजबळ यांना वापरून घेतले. निवडणुकीत ओबीसी समाजाचे प्राबल्य असलेल्या फलटण तालुक्यात रामराजे समर्थक मात्र ओबीसी असलेल्या अनेक नेत्यांनी विरोधी महायुतीला केवळ भुजबळ यांच्यासाठी पाठिंबा दिला आणि आमदार निवडून आणला. मात्र, महायुतीत व अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भुजबळ यांना मानाचे स्थान नसेल तर फलटण तालुक्यातील ओबीसी समाज आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पालिका निवडणुकीत वेगळा विचार करणार असल्याचा गर्भित इशारा देण्यात आला .

शनिवार, ७ डिसेंबर, २०२४

गॉड फादर नाही. ; नियुक्ती गडचिरोली ....?

सातारा : जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासात सर्वात भ्रष्ट पोलीस अधीक्षक अशी ओळख असलेले समीर शेख यांची थांबवलेली बदली आता होणार आहे. दुर्दैव एवढेच की आता त्यांच्या डोक्यावर हात नाही.मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांचे गेले आहे. तेव्हा शेख यांच्या कार्याचा रिपोर्ट ib संस्थेकडून शासनाला गेलाच असणार आहे. त्यामुळे शेख यांनी किती ही जोर लावला तर त्यांना क्रीम पोस्ट मिळणे अशक्य आहे. 



शाहिद अशोक कामटे ते अभिनव देशमुख ते संदीप पाटील ते तेजस्वी सातपुते अशी उज्वल परंपरा सातारा पोलीस दलाला होती. मात्र, कोणतेही पुरावे नसताना अनेक निर्दोष व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे कार्य समीर शेख यांनी केले. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी शेख यांची ठाणे येथे बदली झाली परंतु पुढे स्थगिती देण्यात आली. आता निवडणुका झाल्या आहेत.ib संस्थेचा रिपोर्ट केंद्र व राज्य शासनाच्या गृह खात्याला पाठविला गेला असणार. त्यामुळे शेख यांना ठाणे नव्हे तर पुन्हा एकदा गडचिरोली पोस्टिंग मिळू शकते.

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०२४

इलेक्शन झाले : lcb मधील कलेक्शन कर्मचारी बदलणार केव्हा ?

 सातारा :  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तथा लोकल क्राईम ब्रांच ही पोलीस दलाचा आत्मा आहे. मात्र ह्या ब्रांच मध्ये पोस्टिंग मिळवण्यासाठी आमदार,खासदार यांच्या शिफारशी घ्याव्या लागतात. मात्र, गेली 10 वर्ष स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या नाहीत.




स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोस्टिंग वरून आ.जयकुमार गोरे व तत्कालीन मंत्री शंभूराज देसाई यांच्यात वाद देखील झाला. परिणामी आ.जयकुमार गोरे यांनी डाव मारला. अरुण देवकर यांना चार्ज देण्यात आला. मात्र, सरदार बदलला पण दुय्यम शिलेदार गेली 15 वर्ष तल ठोकून आहेत.  


पोलीस दलात नव्याने दाखल झालेले कर्मचारी आपला हूनर दाखवण्यासाठी तयार आहेत.मात्र त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत संधी मिळत नाही. हे पाहता पोलीस दल नेमके कोणाच्या तालावर नाचतय हा संशोधनाचा विषय तर आहेच उलट गेली 8 ते 10 वर्ष स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत असलेल्या कर्मचाऱ्याची साधी आर्थिक चौकशी होत नाही. ही शोकांतिका आहे. 


गुरुवार, ५ डिसेंबर, २०२४

मोकाट दारू, ताडी , गांजा, मटका विक्री सुरू ; पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांचा महिला करणार सन्मान

 सातारा : राज्याचे गृहराज्यमंत्री आर.आर.पाटील यांनी एखादे गाव नशामुक्त तसेच तंटामुक्त राहावे, लेडी बार यासाठी उलटा कार्यक्रम राबविला. त्यांनी ग्राम सवच्छता तसेच तंटामुक्ती अभियान राबविले. मात्र, आर.आर.पाटील दिवंगत झाले  आणि सर्व योजना बाजूला पडल्या. 



गावोगावी सगळी यंत्रणा सुरू आहे. आदरकी पासून ते आंदरुड. आसू पासून उपलावे पर्यंत मोकाट सगळी यंत्रणा सुरू आहे. फलटण तालुक्यातील कोणत्याही गावात गेले की जो दारूचा ब्रँड पाहिजे तो मिळतोय. वाळू , दबर म्हणूनच गिरवी गावाच्या महिला प्रांत ऑफिस समोर आंदोलन केले.उलट आता 100 पेक्षा जास्त गावातील महिला व पुरुष आम्हाला पण ह्या धंद्याचे साधन उपलब्ध करून द्या, अशी मागणी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्याकडे सन्मानपूर्वक करणार आहेत.

मा.खासदार रणजितसिंह ना.निंबाळकर यांची प्रशासनाला ॲलर्जी ? ; सत्ताधारी बदलूनही प्रशासनाची संकुचित मानसिकता कायम

फलटण : तब्बल 30 वर्षाची राजे गटाची सत्ता उल्थाण्यात माजी खासदार रणजितसिंह ना.निंबाळकर यांना यश आले असले तरी नगरपालिका  प्रशासनाची बुरसटलेली मानसिकता अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी रणजितसिंह ना.निंबाळकर यांनी मलठण ते विमानतळ अशा तब्बल 75 कोटी रुपयांचा रस्त्याचे भूमिपूजन गजानन चौक येथे  करण्यात आले. त्या ठिकाणी रणजितसिंह ना.निंबाळकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या स्पष्ट फलक लावण्यात आला


मात्र निवडणूक जाहीर होताच आचारसंहिता नियमानुसार  सर्वच राजकीय पक्षाचे आणि विकासकामांचे फलक झाकण्यात आले.त्यानुसार गजानन चौक येथील फलकसह रणजितसिंह ना.निंबाळकर यांच्या प्रयत्नाने फलटण शहर व ग्रामीण भागात स्ट्रीट लाईट देखील बसविण्यात आल्या होत्या. त्यावरील देखील फलक झकण्यात आले. आता निवडणुका होवून तब्बल 15 दिवस उलटूनही झाकलेले फलक खुले करण्यात आले नाही. यावरून नगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच ग्रामपंचायती यांची मानसिकता दिसून येत आहे.

फलटण तालुक्यात सत्तांतर होवून नूतन आमदार सचिन पाटील निवडून आले.हे अद्याप प्रशासनाच्या पचनी पडलेले दिसत नाही. शहरात ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि त्यातून उडणारा धुरळा यावर देखील फलटण पालिका प्रशासन नव्याने डांबरीकरण करण्यास तयार नाही. तेव्हा फलटणची बारामती करण्यासाठी निधी तर आणावा लागणार आहेच आणि त्याच बरोबर अजितदादा पवार यांच्याप्रमाणे रणजितदादांना सर्वच प्रशासकीय यंत्रणांवर वाचक निर्माण करावा लागणार आहे.


बुधवार, ४ डिसेंबर, २०२४

मंत्रिपदासाठी साताऱ्याला सांगली पॅटर्न ; तीन की चार मंत्रिपदे मिळणार ?

सातारा : विधानसभा निवडणुकीचा धुरळा आता खाली बसला आहे. आज मुख्यमंत्रीपदासह दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होत असताना मंत्र्यांचा शपथविधी मात्र पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. अशात ज्या सातारा जिल्ह्याने महायुतीला भरघोस यश मिळवून दिले त्या सातारा जिल्ह्याला त्याच तुलनेत आणि सांगली पॅटर्नच्या धर्तीवर मंत्रिपदे देण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांच्या मधून होत आहे.




2009 ते 2014 या कालावधीत सांगली जिल्ह्याला तीन कॅबिनेट मंत्रिपदे देण्यात आली होती.स्व.पतंगराव कदम यांना काँग्रेसकडून तर स्व.आर.आर.पाटील आणि जयंत पाटील यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्री अशी एकूण तीन दणदणीत खाती देण्यात आली होती. मात्र, त्यावेळी सातारा जिल्ह्याला ना.रामराजे ना.निंबाळकर यांच्या स्वरूपात केवळ एक मंत्रिपद देण्यात आले होते.


नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यातून महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आलेत. सध्या शिवसेनेकडून आ.शंभूराज देसाई तर भाजपकडून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व आ.जयकुमार गोरे  आणि राष्ट्रवादीकडून आ.मकरंद पाटील यांचे नाव आघाडीवर आहेत. एकाच सातारा जिल्ह्यातून चार प्रबळ नावे चर्चेत आहेत. अशावेळी एकाच जिल्ह्यातून चार मंत्री करताना महायुती ज्येष्ठ नेत्यांनी सातारा जिल्ह्याला सांगली पॅटर्न वापरून काँगेस व शरद पवार राष्ट्रवादी यांच्या बालेकिल्ल्यात महायुतीचा गड अधिक भक्कम करण्याची संधी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

कारखानदार आमदार झाले ; महिना उलटूनही शेतकऱ्यांना एफ.आर. पी प्रमाणे उसाचे पैशे मिळेनात : रयत क्रांती संघटनेचे प्रकाश उर्फ सोनू साबळे यांचा आंदोलनाचा इशारा

सातारा : कारखानदार आमदार झाल्यानंतर तरी शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे व वेळेत उसाचे पैशे मिळतील, अशी अपेक्षा होती मात्र ती अपेक्षा फोल ठरताना दिसत आहे. सातारा जिल्ह्यात बहुतांश कारखाने सुरू होवून आता एक महिन्याचा कालावधी उलटला आहे तरी देखील एफ.आर. पी प्रमाणे १४ दिवसाच्या आत आणि उसाचा दराप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे अखेर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देणाऱ्या  रयत क्रांती संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.



विधानसभा निवडणुकीत बहुतांश कारखानदार आमदार झाले आहेत. तर काही कारखान्यावर आमदारांचे अप्रत्यक्ष होल्ड आहे. त्यामध्ये पाटण येथील बाळासाहेब देसाई कारखान्यावर आ.शंभूराज देसाई, साताऱ्यातील कारखान्यावर आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, कराडच्या कुष्णा व जयवंतराव भोसले कारखान्यावर आ.अतुल भोसले यांच्यासह फलटण येथील स्वराज कारखान्यावर किंगमेकर माजी खा.रणजितसिंह ना.निंबाळकर यांच्यासह कराड उत्तरचे आ.मनोज घोरपडे यांचा पडळ येथे कारखाना आहे. अशावेळी कारखानदार आमदार झाल्यानंतरतरी शेतकऱ्यांना वेळेत म्हणजेच ऊस कारखान्याला पाठविल्यापासून १४ दिवसाच्या आत एफ.आर. पी प्रमाणे उसाचे पैशे खात्यावर बंधनकारक आहे. मात्र अद्याप एक महिना उलटून देखील शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत आणि अद्याप ऊस दर देखील जाहीर केलेला नाही. त्यामुळे अखेर रयत क्रांती संघटनेचे प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


मंत्री जयाभाऊला एक दणका आवश्यक होता..! हितचिंतकांनी केले मत व्यक्त..!

सातारा: विरोधकांना रावणाची उपमा देणारे मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील वाढता अहंकार  रावणाच्या दिशेने वाटचाल करत असताना नियतीने त्यांना वेळीच...