सातारा: अनेक कारणांनी राज्याचे गृहखाते चर्चेत आहे. साहजिकच गेली दहा पैकी 8 वर्ष गृहखाते ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. मात्र, साताऱ्याच्या पोलीस दलात ते अमुलाग्र बदल ते घडवू शकेल नाहीत. साताऱ्याच्या पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या टप्प्या टप्प्याने होत असल्यातरी सर्वाधिक चर्चेचा विषय असलेल्या सातारा एल.सी.बी.म्हणजेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या गेली 8 वर्षापासून का रखडत ठेवल्या आहेत ? हे लाडके कर्मचारी कोणाचे आहेत? परफॉर्मन्स काय ? याचा आढावा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री शंभूराज देसाई घेणार आहेत का ? की आपल्यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमाणे आरोप होण्याची प्रतिक्षा करित आहेत?
पोलीस दलात सेवा सुरू केल्यानंतर 99 टक्के कर्मचाऱ्यांची इच्छा असते की आपला हूनुर, सिद्धता दाखवण्याची. मात्र, सातारा पोलीस दलात एकाच म्हणजे जसे की वाहतूक ( ट्रॅफिक) शाखेत, डीबी ( डिटेक्शन) आणि सर्वात महत्वाची शाखा म्हणजे एल.सी.बी. ( लोकल क्राईम ब्रांच तथा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा) येथेच गेली अनेक वर्ष तेच आणि तेच कर्मचारी कार्यरत असल्याचे दिसून येते. परिणामी केवळ बंदोबस्ताचे काम पाहण्याची वेळ उर्वरित कर्मचाऱ्यांवर येतेय. मात्र, विशेषतः सातारा पोलीस अधीक्षक ह्यांच्याकडे एल.सी.बी.कर्मचारी यांच्याविषयी लेखी अनेक तक्रारी आहेत.त्यावर काय कार्यवाही केली ? याचे उत्तर प्रस्तुत अर्जदाराना कायदेशीर सौजन्य पोलीस अधीक्षक यांच्याकडे नसल्याचे दिसून येते.
सातारा एल. सी. बी मध्ये आहे नेमके काय ? हे खाते पोलीस दलाचा पाया आहे. मात्र, ही शाखा राजकीय आणि आर्थिक झाल्याची चर्चा आहे. ह्या शाखेच्या पोस्टवर प्रमुख नेमण्यासाठी दिड वर्षापूर्वी माण आणि पाटणमधील दोन नेत्यांमध्ये जुगलबंदी झाली, अशी ही चर्चा आहे.
सातारा एल.सी. बी. शाखा सर्वात कठीण म्हणजे संवेदनशील , स्थानिक पोलीस स्टेशन एखादा गुन्हा उघडकीस आणू शकत नसल्यास अशा गंभीर गुन्ह्यांचा तपास करण्याची, उघड करण्याची, आरोपी जेरबंद जबाबदारी ह्या शाखेवर आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या कार्याचा म्हणजेच आर्थिक अहवाल पडताळणी कॅग करते. मात्र, सातारा एल.सी. बी. आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परफॉर्मन्सचा अहवाल नेमका कधी प्रसिध्द होणार ? सातारा एल.सी.बी.शाखा एवढी ठराविकच कर्मचाऱ्यांना का प्रिय आहेत ? ऑफ द रेकॉर्ड ह्या कर्मचाऱ्यांच्या संपत्तीचा आणि ऑन द कॉल रेकॉर्ड अहवाल कधी तरी गृहमंत्री घेणार आहेत का ?
अन्यथा स्वतः उद्योजक ते मटका, गुटखा, बिअर बार, देशी दारू, ढाबे, स्टोन क्रशर, पवनचक्की ते अनेक सेक्टर मधील वैध ते अवैध व्यावसायिक स्वतः किती महिन्याला देतात, हे गृहमंत्र्यांनी आपली खासगी संस्था कामाला लावून तपासण्याची गरज आहे . तसेच सातारा एल.सी.बी. मध्ये किती सचिन वाझे तयार झाले आहेत, ह्याचा देखील तपास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला अनिल देशमुख होण्याअगोदरच करण्याची आवश्यकता आहे.
भाग १
क्रमशः